काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर  तालुक्यातील काटी येथील  सर्वसामान्य शेतकरी मोहन चंद्रहरी शिंदे यांनी सामाजिक  कार्याचे भान ठेवून  सोमवार  दि. (20 ) रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित तलाठी प्रशांत गुळवे, सरपंच आदेश कोळी, माजी चेअरमन  सयाजीराव देशमुख, यांच्या हस्ते  पाणवठ्याचे उद्धघाटन करण्यात आले. 
     
काटी येथील सर्वसामान्य  शेतकरी  मोहन चंद्रहारी शिंदे यांनी  सलग पाचव्या वर्षी वन्य  प्राणी, पशूपक्षी यांच्यासाठी पानवठा तयार करून त्यांची पिण्याची  पाण्याची सोय  केल्याने  त्यांचे कौतुक  केले  जात आहे. उन्हाळ्याची चाहूल  लागत असल्याने अंगाची लाहीलाही  होत असून नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र ओडे, नाले कोरडे पडले आहेत.उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच सोमवारी पहाटे विजेच्या गडगडाटासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्याचे मोठे नुकसान झाले असून पाण्यावाचून होरपळणारे वन्यप्राण्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. पुढे मे, जुनमध्ये वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी या हेतूने सामाजिक  बांधिलकीची जान ठेवत शिंदे यांनी  वन्यप्राण्यांसाठी सलग पाचव्या वर्षी  पाणवठा करण्याचा उपक्रम राबविल्याने त्यांचे सर्व  स्तरातून  कौतुक  होत असून काटी परिसरात आणखी असे पानवठे तयार करून  वन्यप्राणी, पशुपक्ष्यांची पिण्याच्या सोय करावी असे मत तलाठी प्रशांत गुळवे  यांनी मांडले.

   यावेळी तलाठी प्रशांत गुळवे, सरपंच आदेश कोळी, उपसरपंच सुजित हंगरगेकर, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख,पत्रकार उमाजी गायकवाड, अशोक जाधव, अहमद पठाण, करीम बेग, दत्ता देशमुख,मोहन शिंदे, दिलीप  शिंदे,बंडू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top