मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज सोमवार रोजी विधानभवन येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषद निवडणुकीसाठी २१ मे रोजी मतदान होत आहे. काँग्रेसने दोन जागांचा हट्ट सोडल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होणार हे आता निश्चित झाल आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करते वेळेस त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि दोन्ही मुले उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधीमंडळ सदस्यात्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने त्यांनी राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला होता.