मुरूम, दि.११ : श्री माधवराव पाटील महाविद्यालयात कोविड-१९ च्या पाश्र्वभूमीवर कोरोना महामारी संसर्ग,उपाययोजना आणि वास्तव याविषयावर दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा.डॉ.अरुण खरात यांचे वेबिनार शनिवार(ता.९)रोजी आयोजित करण्यात आला.

प्रोफेसर अरुण खरात बोलताना म्हणाले  की, बी.सी.जी.लसीकरणामुळे भारतीयांची रक्तामध्ये रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे.लॉकडाऊनमुळे सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी चांगली झाल्यामुळेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी झाला आहे.एखादी लस तयार करण्यासाठी १o ते १२ वर्षाचा कालावधी लागतो.पण सध्या कोरोना विषाणूच्या प्रादूर्भाव लक्षात घेता जागतिक स्तरावर सर्वच देशातील शास्त्रज्ञ कोरोना विषाणूवर मात करणारी लस शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर येत्या ऑक्टोंबर -नोव्हेंबर पर्यंत अशी लस येऊ शकते अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.औषध निर्माण शास्त्रामध्ये भारताची कामगिरी जगात एक नंबरवर असल्यामुळे भारतातच या लसीचे निर्मिती होईल,अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली कर्नाटक, गुजरात राज्यासह महाराष्ट्र राज्यातील जवळपास १५० अभ्यासक, संशोधकांनी ऑनलाइनद्वारे सहभाग नोंदविला.हा वेबिनार यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ.अशोक सपाटे,उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार,भौतिकशास्त्र पदवी-पदव्युत्तर विभागातील प्रा.डॉ.सतिश शेळके,डॉ.रवी आळंगे,डाॅ.अरविंद बिराजदार,डाॅ.संजय गुरव,डॉ.महेश मोटे, डाॅ.किरण राजपूत,प्रा. राजीव शाळू,प्रा.करबसाप्पा ब्याळे आदींनी परिश्रम घेतले.


.
 
Top