तुळजापूर : कुमार नाईकवाडी

 तालुक्यातील आरळी बु  येथील ग्रामस्थांनी आपलं घर नळदुर्ग येथील गरीब अनाथ मुलांना लोकप्रबोधन संस्था आरळी ग्रामविकास सेवा मंडळच्या माध्यमातून  कोरोनामुळे तेथील मुलांच्या जेवणासाठी लागणारे ज्वारी ४ क्विंटल,गहू६५ किलो,तांदूळ१३ किलो, ‌साखर १३ ‌‌किलो, मिठ २५ किलो, असा ५१४ किलो साहित्य आरळी ग्रामस्थ वतीने जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांच्याकडे देण्यात आले.

यावेळी  राष्ट्र सेवा दल कार्याध्यक्ष विलास वकील, गुंडु पवार, निजगुण स्वामी, बालाजी शिंदे,आप्पा कानाडे यांच्यासह लोकप्रबोधन संस्थेचे प्रमुख धनाजी धोतरकर,पोलीस पाटील युवराज पाटील, सहायक फौजदार संजय पारवे,उपसरपंच व्यकंट पाटील, दादाराव पारवे,सिद्राम तानवडे,बालाजी माने,दावुद व्हगे, ग्रामसेवक शेख साहेब, लक्ष्मण जवळे, अरविंद बंडगर,सचिन काटकर, प्रभाकर उळेकर यांची उपस्थिती होती.
 
Top