तुळजापुर, दि. ०२ : कुमार नाईकवाडी
म.वि.रा. शिंदे प्रशाला, कुलस्वामिनी विद्यालय व जि. प. शाळेतील 1999 सालच्या दहावीच्या मित्रांनी तुळजापूर शहर व परिसरामध्ये प्रत्येकी 1,000 प्रमाणे 108 गरजू कुटुंबाना नियोजनबद्ध व गुप्त पद्धतीने किराणा वाटपाचा कौतुकास्पद उपक्रम दि.१ में शुक्रवार रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राबविण्यात आला
1999 साली तुळजापूर शहरात दहावी उत्तीर्ण झालेले मित्र मुंबई, पुणे व देशातील विविध शहरात वास्तव्यास आहेत. काही मित्र परदेशात वास्तव्यास आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन च्या स्थितीत आपण ज्या गावात शिकलो त्या गावासाठी काहीतरी केले पाहिजे. आपल्या मित्रांना अडचणीच्या काळात मदत केली पाहिजे. या भावनेतून तुळजापूर शहरातील मित्र व बाहेर वास्तवास असणारे मित्र यांनी तुळजापूर शहरातील, परिसरातील गरजूंना व आपल्या अडचणीत असलेल्या वर्गमित्रांना मदत करण्याचा निर्णय घेतला. मदतीसाठी whatsapp ग्रुप वर आवाहन करण्यात आले. अल्पवधीत तब्बल 1,08,000 रुपये निधी जमा झाला. तुळजापूर शहरातील मित्रांनी शहरातील विविध भागाचा नियोजनबद्ध सर्व्हे करून अत्यंत गरजू कुटुंबांची यादी तयार केली. सदर कुटुंबाना अत्यंत गुप्त पद्धतीने मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरातील एका किराणा मालाच्या दुकानात मदत करण्याऱ्या पैकी कोणीही उपस्थित न राहता मदतीचे वाटप करण्यात आले. मदत करताना मजूर, घरकाम करणाऱ्या महिला, निराधार, अपंग व काही गरजू मित्र यांना प्राधान्य देण्यात आले.
अत्यंत निस्वार्थी भावनेने केलेल्या मदतीचे इतरांनी अनुकरण केल्यास समाजामध्ये मदतीचा मोठा स्त्रोत नक्की उभा राहू शकतो. अशी प्रतिक्रिया विद्यार्थी वर्गातुन करण्यात आली.
1999 साली तुळजापूर शहरात दहावी उत्तीर्ण झालेले मित्र मुंबई, पुणे व देशातील विविध शहरात वास्तव्यास आहेत. काही मित्र परदेशात वास्तव्यास आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन च्या स्थितीत आपण ज्या गावात शिकलो त्या गावासाठी काहीतरी केले पाहिजे. आपल्या मित्रांना अडचणीच्या काळात मदत केली पाहिजे. या भावनेतून तुळजापूर शहरातील मित्र व बाहेर वास्तवास असणारे मित्र यांनी तुळजापूर शहरातील, परिसरातील गरजूंना व आपल्या अडचणीत असलेल्या वर्गमित्रांना मदत करण्याचा निर्णय घेतला. मदतीसाठी whatsapp ग्रुप वर आवाहन करण्यात आले. अल्पवधीत तब्बल 1,08,000 रुपये निधी जमा झाला. तुळजापूर शहरातील मित्रांनी शहरातील विविध भागाचा नियोजनबद्ध सर्व्हे करून अत्यंत गरजू कुटुंबांची यादी तयार केली. सदर कुटुंबाना अत्यंत गुप्त पद्धतीने मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरातील एका किराणा मालाच्या दुकानात मदत करण्याऱ्या पैकी कोणीही उपस्थित न राहता मदतीचे वाटप करण्यात आले. मदत करताना मजूर, घरकाम करणाऱ्या महिला, निराधार, अपंग व काही गरजू मित्र यांना प्राधान्य देण्यात आले.
अत्यंत निस्वार्थी भावनेने केलेल्या मदतीचे इतरांनी अनुकरण केल्यास समाजामध्ये मदतीचा मोठा स्त्रोत नक्की उभा राहू शकतो. अशी प्रतिक्रिया विद्यार्थी वर्गातुन करण्यात आली.