मुरूम, दि. ०२:
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी टास्क फोर्सची व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक शुक्रवार(ता.१)रोजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील,उर्जामंत्री नितीन राऊत,वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख,मंत्री यशोमती ठाकूर विश्वजीत कदम,प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा चारूलता ठोकस,खासदार राजीव सातव,माणिकराव ठाकरे,डॉ.उल्हास पवार,डॉ.शोभाताई बच्छाव,विलास मुत्तेमवार,नसीम खान,चंद्रकांत हंडोरेसह विविध मंत्री व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना बसवराज पाटील यांनी काही प्रमुख मागण्या मांडल्या यामध्ये उस्मानाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात कोविड-१९ चाचणी लँब सुरुवात करण्यात यावी,सीएसआर [कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी] औद्योगिक सामाजिक बांधिलकीबाबत चर्चा करताना एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी १३ टक्के उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून होते.राज्यातील प्रमुख उद्योगधंदयांमध्ये रासायनिक आणि संबंधित उत्पादने,विद्युत आणि साधी यंत्रे,कापड,पेट्रोलियम आणि तत्सम उद्योगांचा समावेश होतो.केंद्र सरकारला सर्वाधिक रक्कम कराच्या स्वरूपात देणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.आजपर्यंत महाराष्ट्राने २६ हजार कोटींहून अधिक रक्कम जीएसटी म्हणून केंद्राला दिली आहे. याबाबतही चर्चा करण्यात आली.सध्याच्या स्थितीत शेतकऱ्यांना शेतीसाठी वीजपुरवठा नियमित व दिवसभर राहावा.लॉकडाऊन नंतर जे जिल्हे ग्रीनझोन मध्ये आहेत अशा जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून प्रवेश करणाऱ्या व्यंक्तीची तपासणी करुनच त्यांना जिल्ह्यात प्रवेश द्यावा अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांना द्याव्यात.ग्रीनझोन जिल्ह्यातील उद्योग-धंदे सुरु करताना विशेष करुन शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाना प्राधान्य द्यावे.सध्याचे संकट लक्षात घेता शेती उद्योगावर अधिकभर द्यावा.त्यामुळे अर्थव्यवस्थेला मदत होऊन व यावर अवलंबून असणाऱ्या लोकांना रोजगारही उपलब्ध होईल.महाराष्ट्रातले जे विद्यार्थी दिल्ली,राजस्थान व इतर राज्यात अडकलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना आणण्यासाठी विशेष व्यवस्था करावी आदि विषयांवर सविस्तर चर्चा करताना बसवराज पाटील यांनी कोविड-१९ चाचणी लँब लवकरच जिल्ह्यात सुरु करण्याचा प्रस्तावही ठेवला मंत्री अमित देशमुख यांनी या प्रस्तावाला संमती दर्शविली.समारोपाच्या वेळी कोरोना विषाणूच्या संकटामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व यंत्रणांचे विशेष कौतुक करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.सर्व कार्यकर्त्यांनी या लढयात गरजूंना मदत करावी.जे लोक या लढयात लढतायत त्यांना आपण देवू या भक्कम साथ, असे ही आवाहन शेवटी यावेळी करण्यात आले.