तुळजापूर, दि. ०९ :
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापुर च्या माध्यमातून तुळजापूर शहरातील भोपे पुजारी,
पाळकर पुजारी, उपाध्ये पुजारी, व्यापारी, मंदीरातील सुरक्षा रक्षक,स्वच्छता कर्मचारी,तसेच अत्यंत गरजु कुटुंबाना आणखी ५००० अन्नधान्याचे किट दिले जाणार अशी माहिती मंदीरचे व्यवस्थापक तथा तहसिलदार सौ.योगिता कोल्हे मॅडम यांनी दिली.तुळजापूर शहरातील सर्वसामान्यांचा उदरनिर्वाहच मंदीरशी निगडीत आहे.सध्या कोव्हीड १९ च्या प्रादुर्भावामुळे हातावर पोट असलेला वर्ग मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला असून अशा परिस्थितीत तुळजापूर शहरातील अत्यंत गरजु कुटुंबाना आधार देण्याच्या अनुषंगाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापुर च्या वतीने यापुर्वीच ५००० अन्नधान्याचे किटस उपलब्ध करुन देण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी जिल्हाधिकारी सौ दिपा मुधोळ मुंढे यांना दि.२३ एप्रील व ८ मे रोजी याबाबतचे निवेदन दिले होते.त्याच बरोबर दि.७ मे रोजी मंदीरचे तहसिलदार तथा व्यवस्थापक यांना ही निवेदन दिले होते. मा.जिल्हाधिकारी यांनी काल दि.०८/०५/२०२० रोजी आमच्या दिलेल्या निवेदनाची दखल घेवून आणखी ५००० किटस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अमरराजे कदम यांनी सांगितले.
या किटस पुढील आठवडयात उपलब्ध करून देवू असे आश्वासन मंदीरच्या तहसिलदार कोल्हे मॅडम यांच्याकडून देण्यात आले. यानिमित्ताने मनसेच्या मागणीमुळे आणखी ५००० गरजूवंतांना निश्चितपणे लाभ घेता येईल.