तुळजापुर : कुमार नाईकवाडी
रिपाइं च्या वतीने तुळजापुर शहरातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील कार्यकारी अभियंतास ६ माहिन्याचे बील माफ करावे अशा प्रकारचे एक लेखी निवेदन दिले.
निवेदनात असे म्हटंले आहे की कोरोना पादुर्भाव रोगामुळे तुळजापुर शहरातील सर्व नागरीकांचे आर्थिक व्यवहार डबघाईला आल्याने त्यामुळे तुळजापुर शहर वाशियांचे आतोनाथ हाल होत आहेत त्याचबरोबर मजुराच्या हाताला काम नाही व्यापारी,शेतकरी ,शेतमजुरांचे यांचे पुर्ण व्यवहार ठप्प झाल्याने शहरातील नागरीकांचे ६ महा माहिन्याचे बील महावितरण माफ करावे. तर दुसऱ्या निवेदनात तुळजापुर येथील मुख्याधिकारी यांच्या कडे ही नगर परिषद ने ६ माहिन्याची घरपट्टी, नळपट्टी माफ करावी अशा प्रकारचे एक लेखी निवेदन देण्यात आले. या निवेदनावर रिपपब्लीकन पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष आनंद पांडागळे ,जिल्हा सरचिटनीस तानाजी कदम शहर अध्यक्ष अंकुश कदम,व नगरसेविका वैशाली कदम यांच्या स्वाक्षरी आहेत.