बेंबळी, दि. १६ :
उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथे नूतन राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आदित्य जीवनराव गोरे यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बोरखेडा,उमरेगव्हाण,विठ्ठलवाडी शिवारातील प्रमूख शेतकरी बांधवांची भेट घेतली. तर बेंबळीतील पी.एम किसान सन्मान योजनेतून काही शेतकरी वंचित असल्याची बाब माजी सरपंच जीवनराव बरडे यांनी यावेळी सांगितले सविस्तर शेतीविषयक चर्चा झाली.
यावेळी ज्ञानदेव खापरे-पाटील,इम्रान खान पठाण,माजी सरपंच बाळासाहेब कणसे,युसूफ शेख, खरेदी विक्री संचालक ज्ञानदेव निकम,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सहकरी कारखाना संचालक शंकर माळी,राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हासंघटक मजर शेरीकर माजी ग्रामपंचायत सदस्य सरदार पटेल,इफ्तेकार शेख,श्रीमंत पवार,आदम जमादार,हुजूर शेख,हरिभाऊ डावकरे,यांची यावेळी उपस्थिती होती..