मुरुम : येथील नगरपरिषदेच्या वतीने आयोजित शहरातील डॉक्टर, पत्रकार, पोलीस व सफाई कामगार व कर्मचारी आदिंना जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील यांच्या हस्ते बुधवार (ता. सतरा) रोजी नगर परिषदेच्या सभागृहात डॉक्टर व पोलीस यांना पीपीटी कीट व ९५ मास्कचे तर पत्रकार, सफाई कामगार व कर्मचारी यांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी  नगराध्यक्षा अनिता अंबर, मुख्याधिकारी हेमंत किरूळकर, उपनाराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे आदींच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. नगरसेवक रशिद शेख, सहदेव गायकवाड, शभुलिंग पाटील, संतोष चिलोबा, आयुब मासुलदार, सिध्दु स्वामी, अजित चौधरी, इब्राहिम नदाफ, सुरेश शेळके, मंगल नारायणकर, विजयश्री भालेराव, सुलभा अंबुसे, ज्योती बन्ने, सुनंदा कुंभार, महानंदा गुंडगुळे, सुमन देडे, फरजाना कोतवालसह नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.     
               
  माणूसच माणसाच्या कामी येतो असे कै.माधवरावजी पाटील उर्फ काका सतत मनायचे. याच विचारांचा वसा आणि वारसा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील व त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील यांनी हाच माणूसकीचा धर्म जोपासत आहेत. याच भूमिकेतून नगरपरिषदेनेही कोरोना संकटात जीवाची बाजी लावून सतत आरोग्य, पोलीस, पत्रकार, सफाई कर्मचारी व व्यापारी बांधव प्रत्यक्ष काम करीत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यांच्या प्रती माणूस म्हणून कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. सध्या राज्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी शासनाने संचारबंदीची घोषणा करून ता.३० जून पर्यंत ती वाढविण्यात आली असल्याने यासर्वाची काळजी घेणे महत्वाचे आहे. या हेतूने पीपीटी कीट व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.वसंत बाबरे, डॉ.राधाकृष्ण डागा, डॉ.एस.आर.पाटील, डॉ.एस.आर. काबरा, डॉ.विजयानंद बिराजदार, डॉ.राहूल चिलोबा, डॉ.शिवराज हाळ्ळे,  डॉ.बळवंत चव्हाण, डॉ. सुवर्णा पाटील, डॉ.रेवाती शिंदे, डॉ.प्रशांत शिंदे, डॉ. महेश जिरोळे, डॉ. शिवशंकर कारडामे, जाफर मोमीन यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप,  व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अशोक मिणीयार तर पत्रकार महेश निंबरगे, राजेंद्र घोडके, शफी इमडे, डॉ.महेश मोटे, डॉ.सुधीर पंचगल्ले, रवि अंबुसे, विलास वाडीकर, 
देवराज संगुळगे, रामलिंग पुराणे आदिंसह गोपीचंद राठोड, तुकाराम राठोड, श्रावण गायकवाड, प्रशांत सुरवसे, पवन कांबळे, आशिष मुरूमकर, मोहन राजपूत, ललिता कांबळे, वैशाली सोनकांबळे, शांताबाई कांबळे आदींना मास्कचे वाटप केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष सुधीर अंबर यांनी केले. सुशिल कांबळे, पाशा जेवळे, महादेव घाळे, अतिक अत्तार, देविदास मुरुमकर, वैभव कदम, विक्रम देवकर आदिंनी पुढाकार घेतला.                           

   यावेळी शरणजी पाटील म्हणाले की, कोरोना संकटात सर्व पक्षीय नेते मंडळी व कार्यकर्ते एकमेकांना सहकार्य करीत आहेत. सर्वांनी मिळून या कोरोनाचा सामुदायिक पध्दतीने मुकाबला केला पाहिजे. आपल्या शहराला एक वेगळी परंपरा असून त्या परंपरेनुसार चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. या संकटात ज्यांनी जीवाची बाजी लावून काम केले. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्याप्रती चांगली भूमिका ठेवणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे शेवटी त्यांनी म्हटले.



                                                    ,
 
Top