उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बियाणे बाबतच्या तक्रारीच्या अनुशंगाने बियाणे निरीक्षक तथा कृषी अधीकारी, उस्मानाबाद बापु रोहीदास राउत व ज्ञानेश्वर रामराव जाधव, यांनी शेतकऱ्यांचे शेतात जाउन पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांना 7- 23 % व 35- 40 % बियाणाची उगवण झाल्याचे दिसुन आले. यावरुन 1)गजानन किसनराव काळे- बसंत ॲग्रोटेक ई, लि, अकोला, 530030 बियाणे कंपनीचे संचालक 2)दगडु नानाभाउ अंभोरे- कृषीधन सिडस प्रा.लि. जालना कंपनीचे संचालक व्यवस्थापक (मुख्य कार्यालय साई कॅपीटल- 9 वा मजला, शिवाजी नगर, पुणे) या दोन कंपनीने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी शेतकऱ्यांना दर्जाहीन सोयाबीन बियाणे पुरवठा केल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवली असुन संबंधीत बियाणे उत्पादकांनी शेतकऱ्यांची व शासनाची फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या नमूद दोन कृषी अधिकारी यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वर नमूद दोन्ही कंपनी विरुध्द भा.दं.सं. कलम- 420 सह बी- बियाणे कायदा व बी- बियाणे नियम अन्वये पो.ठा. उस्मानाबाद (श.) येथे स्वतंत्र 2 गुन्हे दि. 04.07.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.