ताज्या घडामोडी


तुळजापूर, दि. 15 :  येथील उपजिल्हा रुग्णालयाने नातेवाईकास न कळवता एका मुलाचा अंत्यविधी उरकल्याची तक्रार मयताच्या नातेवाईकांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,  शहरातील  रितेश आविनाश राऊत (१६ )  याला दम्याचा त्रास असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर वैद्यकीय अधिका-यांनी त्याचे  स्वॅब पाठवले असून रिपोर्टनंतर  कॉल करुन प्रेत तुमच्या स्वाधीन केले जाईल असे नातेवाईकास सांगितल्याचे नमूद केले आहे. मात्र  कोणतीही कल्पना न देता परस्पर नगर परिषद  व उपजिल्हा रुग्णालयाने अंत्यविधी उरकल्याची तक्रार तहसीलदार मार्फत जिल्हाधिका-याकडे केली  आहे. या निवेदनावर अनिरुध्द नरसिंहराव राऊत यांची स्वाक्षरी आहे. 
 
Top