तुळजापूर, दि. 22 : तालुक्यातील खडकी तांडा येथे बालविवाह झालेल्या दोन बालिकेवर होणारे अत्याचार थांबविण्याची मागणी करुन बालविवाहास उपस्थित असणा-यांविरुध्द कार्यवाही करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना मंगळवार (दि. 22) रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ११ जून रोजी खडकी तांडा ता. तुळजापूर येथे अल्पवयीन मुलींचे लग्न लावण्यात आल्याचे सांगून लग्न होण्या अगोदर संबंधित यंत्रणेला माहिती दिली असता संबंधित यंत्रणा तातडीने तिथे पोहोचली आणि होणारा बालविवाह रोखण्यात आला. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी संबंधितांना सांगितले की, हे लग्न नसून केवळ साखरपुडा आहे. हे ऐकताच पथक परत गेले. त्यानंतर अल्पवयीन मुलींचा विवाह पार पडला. याप्रकरणी कसून चौकशी करुन लग्न लावणा-या व उपस्थित लोकांवर कार्यवाही करण्याची मागणी मिथुन सुखदेव जाधव यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे केली आहे.  या निवेदनावर मिथुन सुखदेव जाधव यांची स्वाक्षरी आहे.

 
Top