बेंबळी, दि. ०७ :
उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी गावचे सरपंच सत्तार शेख यांची सरपंच परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे शाल,पुष्पहार,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत रणदिवे यांनी बेंबळी गावचे सरपंच श्री सत्तार शेख अनुभवी व्यक्तिमत्व, गावाच्या विकासाठी अहोराञ परिश्रम करणा-या व्यक्ती पैकी तसेच प्रशासनातील दांडगा अभ्यास या मुळे त्यांची या पदावर निवड करण्यात आली.
बेंबळी गावच्या विकासाला सदैव तत्पर राहून विकास कामात स्वतःला झोकून देऊन काम करणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतूक होत आहे.याचाच भाग म्हणून बेंबळी ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले या सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित हाजी मैनुद्दीन दर्याजी सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व पुढील काळामध्येही बेंबळी गावामध्ये भरपूर विकासाची कामे करावी व गावचे नाव लौकिक करावे अशी यावेळी ते बोलत होते.
आगामी काळात गावाच्या विकाससाठी भरीव निधी आणून ऊर्वरित विकास कामांना प्राधान्य देणार असे यावेळी सरपंच मा.सत्तार शेख या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते यावेळी प्रगती महिला ग्रामीण सहकारी संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक अल्लानूर शेख,मदार शेख,मोजमअली सय्यद,मुजावर सर,शुकूर पठाण,जुम्माभाई शाह,युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील सद्दाम शेख,खलील शेख,राजूभाई शेख, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते...