तामलवाडी : सर्जेराव गायकवाड 

तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील टोलनाक्यावरील हायमस्ट पथदिवे हे गेली तीन महिन्यापासून बंद असल्याने टोलनाक्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले असुन अपघात होण्याचा धोका निर्माण झाल्याने सदरील हायमस्ट पथदिव्यांची अवस्था ही असुण अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे.
     
 सोलापूर ते धुळे या राष्ट्रीय राजमार्गावर तामलवाडी येथे टोलनाका उभारण्यात आला असुन या टोलनाक्यावर रात्री उजेडासाठी दोन्ही बाजुस प्रत्येकी तीन हायमस्ट असे सहा पथदिवे बसवण्यात आले आहेत.प्रखर उजेडासाठी बसवण्यात आलेले हे सहा हायमस्ट पथदिव्यापैकी चार हायमस्ट पथदिवे हे गेली दोन महीन्यापासुन बंद आहेत तर उरलेल्या दोनपैकी त्यावरील एक ते दोनच फोकस चालु असल्याचे दिसुन येत आहे त्यामुळे टोलनाक्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले असुन संबधित गुत्तेदाराचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.रात्री टोल भरल्यानंतर अनेक मोठी वाहने रस्त्यावरच उभारत असल्याने दोनचाकी वाहनाना अडथळा निर्माण होत आहे व टोलनाक्यावर अंधार असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.बंद असलेल्या या पथदिव्यांची अवस्था ही असुन अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. तसेच गावातील मोठ्या भुयारी मार्गातील लाईट बंद असल्याने महीला,मुली,वृद्धांना ये जा करताना संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे टोलनाक्यावरील बंद असलेले पथदिवे व भुयारी मार्गातील लाईट लवकरात चालु करावी अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थांमधुन होताना दिसत आहे.

हायमस्ट पथदिव्यांचा शेतकर्यांना त्रास होतो. हायमस्ट पथदिवे बंद असल्याबाबत टोलनाक्यावरील काही अधिकार्याशी चर्चा केली असता हायमस्ट पथदिवे चालु असल्यास पिकावर परीणाम होतो अशी अजब तक्रार शेतकरी करीत असल्याची माहीती मिळाली आहे.तर काही शेतकरी हायमस्ट पथदिवे चालु असल्यास शेतीला पुरेशी विज मिळत नाही म्हणुन स्वतः येऊन दिवे बंद करत असल्याचेही अधिकार्यांकडुन सांगण्यात आले आहे.परंतु शेतकर्यांची नावे सांगण्यास नकार दिला.
 
Top