अणदूर, दि. 26 : तुळजापूर येथील अणदूर येथील जवाहर महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्यावतीने प्रा. सत्येंद्र राऊत यांच्या वाढदिवसानिमित राष्ट्रीय स्तरावर निबंधस्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे आहेत : -
विदयार्थी गट
1)कोरोनानंतरची जीवनशैली
2)कोरोना संकट इष्टापत्ती ठरेल का ?
3)आॅनलाइन शिक्षण प्रणाली उपयुक्त ठरेल का ?
खुला गट
1)चला कोरोनासोबत जगायला शिकू या
2)कोरोना काळात माणुसकीचे दर्शन
3)कोरोनामुळे उद्भवलेली शेतकऱ्यांची अवस्था.
तरी इच्छुकांनी दि. 5 ऑगस्ट पर्यंत आपले निबंध टाइप करुन किंवा हस्तलिखित निबंध rautsatyendra07@gmail.com ईमेलवर किंवा प्रा. सत्येंद्र राऊत यांच्या मोबाईल नं. 8208740880 किंवा 7387394747 या नंबरवर निबंध पाठवावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उमाकांत चनशेट्टी व संस्कृत विभागाच्या डॉ. सुरेखा भारती यांनी आवाहन केले आहे. विजेत्यांना पुरस्काराच्या स्वरुपात रोख रक्कम व सहभागींना आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येईल.