तुळजापुर : कुमार नाईकवाडी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तुळजापुरात येथील राजे शहाजी महाद्वार समोर मंगळवार दि. २१ जुलै रोजी प्रतिकात्मक स्वरुपात दुध आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे, यासाठी तुळजापुर शहरातुन बैलगाडी वर मोर्चा काढुन तहसीलदार यांना मागण्या निवेदन देण्यात आले. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटंले आहे की, जिल्ह्यातील अनेक तरुण नौकरी मिळत नसल्यामुळे शेती व्यवसाय कडे वळले आहेत. अनेक कुंटुब दुग्ध व्यवसावर अवलंबून आहे. गेल्या तीन महिन्यांपासून संपुर्ण महाराष्ट्रात लाँकडाऊन असल्याने दुग्ध उत्पादक हा मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. तरी या राज्य सरकार ला जाग येत नाही. त्यामुळे दुध उत्पादकाना न्याय देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रस्त्यावर उतरावे लागले आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे यासाठी केद्रं शासनाने २३ जुन ला १० हजार टन दुध पावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय त्वरीत रद्द करावा, ३० हजार टन दुधपावाडर चा बफर स्टाँक करावे तसेच निर्यात अनुदान प्रति किलो ३० रुपयाने देण्यात यावे, दुध पावडर, तुप, बटर इतर दुग्धजन्य पदार्थावरील जी.ए.स.टी रद्द करावा, पुढील तीन माहिन्यासाठी राज्य सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर ५ रुपये अनुदान जमा करावे, दुध उत्पादकांना आर्थिक अडचणीतुन बाहेर काढण्यासाठी वरील मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा स्वाभीमानी शेतकरी संघटने च्या वतीने भविष्यकाळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे रविद्रं इंगळे, धनाजी पेंदे, राजु हाके, गुरुदास भोजने जमदाडे आदीसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.