उस्मानाबाद, दि. 15 : जिल्हयात शनिवार दि. 15 ऑगस्ट रोजी जिल्हयात सायंकाळी आलेल्या प्राप्त अहवालानुसार 185 जणांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. तर गेल्या चोवीस तासात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 22 जण बरे होऊन घरी परतले आहेत.

जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या आता 3 हजार 414 वर पोहचली आहे. यापैकी 1 हजार 650 जण बरे होऊन घरी परतले असून 1 हजार 667 जणांवर उपचार सुरु आहे. तर आतापर्यंत जिल्हयात 97 जणांचा मृत्यू झाला आहे.

आज पॉजिटीव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील 70, तुळजापूर 22, उमरगा 27, कळंब 17, परंडा 24, लोहारा 6, भूम 16, वाशी तालुक्यातील 3 जणांचा समावेश आहे. 

जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांच्या वतीने डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ औरंगाबाद येथे एकूण 453 स्वब पाठविण्यात आले होते त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे तसेच जिल्हयातील रॅपिड अॅटिजेन चाचणीचा अहवाल खालीलप्रमाणे आहे. 







 
Top