वागदरी : एस.के.गायकवाड

जवाहर महाविद्यालय  अणदूर , ता.तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद  द्वारा संस्कृत विभागामार्फत संस्कृत विषायाचे प्रा.सत्येंद्र राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना विषयावर आधारित राष्ट्रीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 105  स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून देशातील विविध राज्यांमधून निबंध आले होते.सर्वचं निबंध अप्रतिम दर्जाचे असून या स्पर्धेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला आहे.

यामध्ये बाल गटातून  कु.साक्षी काळे पुणे प्रथम, देवांश क्षीरसागर सोलापूर द्वितीय,  कु.भक्ती पोतदार नळदुर्ग व शुभम राऊत सिल्लोड यांना विभागून तृतीय, तर उत्तेजनार्थ म्हणून श्रुती भूमकर, नळदुर्ग, सानिका शिंदे भूम, तसेच महाविद्यालयीन गटातून ध्रुव जैन, शिवपुरी मध्यप्रदेश प्रथम विनायक पालीवाल जयपूर व कु. जयश्री मोहरे  पुणे यांना विभागून द्वितीय, कु. तन्वी दिघे पुणे व प्रिया गवळी केशेगाव यांना विभागून तृतीय तसेच उत्तेजनार्थ पुरस्कार प्रतिक्षा स्वामी लातूर व पूजा मोरे सातारा, तसेच खुल्या गटातून सौ.सुष्मा गंगुलवार मुंबई व श्री.भिमांशु शर्मा जयपुर विभागून प्रथम,  सौ.विजया ठाकरे नागपूर व सौ.रझिया ईस्माईल जमादार अक्कलकोट यांना विभागून द्वितीय, तर रुपेश बिर्हाडे जामनेर व फरहीन शेख लातूर यांना विभागून तृतीय आणि उत्तेजनार्थ म्हणून स्नेहा पोतदार नळदुर्ग व आरती चौगुले अणदूर यांना विजयी घोषित करण्यात आले. 

या राष्ट्रीय निबंध स्पर्धेतील सर्व  यशस्वी स्पर्धकांना लवकरच पुरस्काराच्या स्वरुपात रोख रक्कम व प्रमाणपत्र तसेच सहभाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

या निबंधस्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पुणे येथील शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्त्या सहशिक्षिका प्रतिमा काळे यांनी काम पाहिले तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी सर व प्रा. सत्येंद्र राऊत यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


 
Top