जळकोट : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील संभाजी गणेश तरुण मंडळाच्या युवकांनी आलियाबाद येथील श्रावण सोमवार निमित्त भीमाशंकर व वीरभद्रेश्वर या देवस्थानाला जाऊन कोरोना हा महामारीचा काळ लवकरात लवकर संपुष्टात यावा. दैनंदिन जीवन पूर्व अवस्थेत यावे, यासाठी एक दिलाने स्वच्छ शुद्ध अंतकरणाने शास्त्रशुद्ध पद्धतीने या देवाला पाचशे एक बेल पानं वाहून आपली इच्छा मनोभावे व्यक्त करून देवाला साकडे घातले.
यावेळी चौफेर कवी सुरज अंगुले, विनोद हिंडोळे, श्रीकृष्ण हासुरे, संभाजी दरेकर, महावीर दरेकर, वैभव मडोळे, संतोष स्वामी उपस्थित होते.