चिवरी : राजगुरु साखरे 

शेतकऱ्याच्या लाडक्या सर्जा राजाचा सण अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. यंदा तुळजापूर तालुक्यातील चिवरी पंचक्रोशी मध्ये अत्यल्प कमी पाऊस पडल्यामुळे मोठा पाणीसाठा झाला नसल्यामुळे शेतकरी बांधव अडचणीत आला आहे. त्यातच वर्षभर शेतामध्ये कष्ट करून एक दिवस आपल्या लाडक्या सर्जा-राजा साठी शेतकरी बैलपोळा सण साजरा करतो. परंतु यावर्षी शेतकऱ्याला कोरानासारख्या महामारी संकटामुळे शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही, दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे. यामुळे या वर्षी शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. यंदा बैल धुण्यासाठी त्यांना पोहणी घालण्यासाठी तालुक्यात मोठा पाऊस झाला असल्याने परिणामी धरणात पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये बैल पोळा सणाच्या काळात निरव उत्साहाचे वातावरण आहे. 

यंदा सुरुवातीपासूनच रिपरिप पावसाने हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात केल्या असून रिमझिम पावसामुळे पिके चांगली आहेत. मात्र रोगराईच्या  कचाट्यात सापडली आहेत. तसेच यंदा तालुक्यात मोठा पाऊस नसल्याने तालुक्यातील सर्व लहान-मोठी धरणे तहानलेलेच आहेत. बैल पोळा सणावर यंदा कोरोनाच्या सावटामुळे शहरातील व्यापाऱ्यांनी जनावराच्या सजावटीसाठी लागणारे रंगीबेरंगी विविध साहित्य विक्रीसाठी कमी प्रमाणात आणले आहेत. परंतु महागाई आणि पावसाचा हुलकावणी यामुळे बैलपोळ्याच्या सणासाठी असलेल्या वस्तूची दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे बैलपोळा सणासाठी जनावरांच्या सजावटीसाठी वस्तू खरेदी करताना हात आखडता घेण्याची नामुष्की बळीराजावर ओढावली आहे. मोठा पाऊस नसल्यामुळे आणि दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई व त्यातच कोराना यामुळे यंदा बैलपोळा सण साधेपणा साजरे करत असल्याचे चित्र दिसत आहे.

 
Top