उस्मानाबाद, दि. 11 : उस्मानाबाद जिल्हयात आज शुक्रवार दि. 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 192 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 525 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 8 हजार 42 झाली आहे. यातील 5 हजार 756 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 232 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 54 जणांवर उपचार सुरु आहे.