नळदुर्ग, दि. 19 : तीर्थक्षेत्र तुळजापुर, नळदुर्ग, अणदूरसह अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यात येणा-या नळदुर्ग येथील कुरनूर (बोरी धरण) मध्यम प्रकल्पात दि. 18 सप्टेंबर पर्यंत 36 टक्के पाणीसाठा झाला आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून नळदुर्ग व परिसरात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे बोरी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. 35 दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता असलेल्या या धरणात सध्या 11.63 दशलक्ष घनमीटर म्हणजे 36 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नळदुर्ग मंडळात शुक्रवारी सकाळपर्यंत 557 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कुरनूर मध्यम प्रकल्प अंतर्गत येणा-या साठवण तलावापैकी गंधोरा, देवसिंगा येथील साठवण तलाव ओव्हर फ्लो झाले असून त्यातून होणा-या पाण्याचा विसर्ग बोरी धरणात मोठ्याप्रमाणात होत आहे. बोरी धरण्याच्या पाणी पातळीमध्ये एका दिवसात 4 फुट पाण्याची वाढ झाली आहे.