उस्मानाबाद, दि. 8 : जिल्हयात रविवारी झालेल्या वादळी पावसाने ऊसाच्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकयांना शासनाकडून त्वरीत मदत देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे पुर्व मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे यांनी आज मंगळवारी (दि.8) रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दि. ६ सप्टेंबर रोजीच्या रात्री उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला या वादळी पावसाने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्याचां ऊस जमीनीवर आडवा पडला त्यामुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरच गेल्या सात महिन्यापासून सुरु असलेल्या कोवीड-19 या संसर्गजन्य साथीमुळे शेतक-यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. पर्यायाने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच पर्वा झालेल्या वादळी वा-यात उस्मानाबाद जिल्हयातील शेकडो शेतक-यांचा ऊस भुईसपाट झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना शासनाकडून मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने तातडीने नुकसान झालेल्या ऊस पिकाचे पंचनामे करुन शेतकऱ्यानां तात्काळ मदत देण्याची कार्यवाही करावी अशी मागणी कोळगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.