उस्मानाबाद : महेश पाटील 

देशातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्याला आता कुठे चांगला भाव येऊ लागल्याचे दिसत होते.  चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्यांना होती, पण केंद्रातील जुलमी मोदी सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. या निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव पडून शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक झाले. याचा निषेध म्हणून पंतप्रधान यांना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने पोस्टाने भेट म्हणून कांदा पाठविण्यात आले आहे.

यावेळी युवती प्रदेश अध्यक्षा कु. सक्षणा सलग, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षा कु. देवकन्या गाडे-पाटील यांची उपस्थिती होती..


 
Top