कळंब, दि. 08 : तालुक्यातील वडगाव (ज) येथील शेतकरी कुटुंबातील डॉ. निखिल नवले हे या भागातील पहिले न्यूरोलॉजिस्ट झाले आहेत. ते यापुढे मायभूमीतच रुग्णांची सेवा करणार असल्याने त्याचा फायदा रुग्णांना होणार आहे.
ऑगस्ट महिन्यात न्यूरोलॉजी या विषयावर झालेल्या बोर्डाची राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा डॉ. निखिल नवले हे विशेष प्रविण्याने उत्तीर्ण झाले. त्यांनी या परीक्षेत सर्वोच्च गुण मिळवले आहेत. आपल्या जन्मभूमी प्रती असणारे प्रेम व आपल्या मराठवायातील शेतकरी आणि कष्टकरी रुग्णाचा सेवेकरीता काम करण्याचे त्यांनी ठरविले असल्यामुळे ते उस्मानाबाद येथे लवकरच कार्यरत होत आहेत.
त्यांचे उच्च शिक्षण हे भारतातील नावाजलेल्या बंगलोर मध्ये झाले. तिथे त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गुरु लाभले. त्यांनी काही काळ अशियातील सर्वात मोठ्या न्युरोसा या सेंटरमध्ये ही काम केले. तिथे त्यांनी "लहान मेंदू याचा माणसाच्या प्रज्ञाशक्ती वर असणारा परिणाम" याचा वर संशोधन केले. त्यांचा शोध निबंध हा प्रकाशनाचा वाटेवर आहे. भारतामध्ये अशाप्रकरे करण्यात आलेला पहिलाच संशोधन असावे. तिथे त्यांनी अर्धांगवायू, अपस्मार, झटके, मेंदू ज्वर, कंप वात, स्मृती ब्रंश, म्यास्थेनिया ग्रविस, न्यूरोपॅथी, परापलेजिया इत्यादी विविध आजराने पीडित असलेला रुग्णांचे निदान व उपचार केले.
त्यांनी त्यांचा एम. डी.जनरल मेडीसिन ही डिग्री भारतातील पहिल्या तीन क्रमांकात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे केले. सन 2012 मध्ये घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत ते देशात तेरावे आले होते. महाराष्ट्र मधून तिथे मेडीसिनला फक्त तीन डॉक्टरच निवडले होते. त्यांना महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक व नवी दिल्ली इथे ही काम करायची संधी होती. परंतू भारतीय लषकरात काम करायची इच्छा असल्याचे त्यांनी त्यांचा कुटुंबाला बोलून दाखवली व कुटुंबातील सर्वजण तयार झाले. एफ.एम.सी पुणे इथे बौद्धिक तसेच शरारिक तयारीला सुरूवात झाली. तिथे ही त्यांनी आपली छाप पाडली. तिथे त्यांनी एच. आय. व्ही. बाधित सैनिकांचा अनिमिया वर संशोधन केले. तिथे असताना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर चा परिषदे मध्ये पोस्टर प्रदर्शन केले.
सन 2012 रोजी कामावरून घरी जात असताना पुण्यातील परिसरात त्यांचा मोटर सायकल चा अपघात झाला. त्यांना हात-पाय कंबर खुबा फासल्याने गंभीर जखम झाली होती. हेल्मेट घातले असल्या मुळे मेंदूला जास्त हानी नव्हती पोहचली. त्यांना पुण्यातील जेहांगिर व कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार झाले. अपघातानंतर अर्धा डझन शस्त्रक्रिया करून येथील डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवले. नंतर काही दिवसांनी जेव्हा त्यांना शुध्दी आली आणि झालेला प्रकार कळला. त्यावेळेस ते पार कोलमडून गेले. त्यांचा उजवा हात निकामी झाला होता व तो काम करणे अशक्य होते.
स्वतः डॉक्टर असल्याने त्यांना त्यांची वस्तुस्थिती लगेच लक्षात आली. आता सर्व संपले आहे अशी धारणा झाली. परंतु कुटुंबातील सदस्य आणि मित्र मंडळी याने धीर द्यायचा काम केले. एफ.एम.सी तील सर्व सहकारी व उच पदस्थ अधिकारी ही जातीने त्यांचा प्रकृती वर लक्ष ठेवून होते. या वेळी सर्व अधिकारयांनी खूप सहकार्य केले. त्यांना पुन्हा नव्याने सरूवात करण्याची प्रेरणा दिली.
अपघातामुळे आलेल्या विकलांगतेमुळे ते भारतीय सेनेत रुजू होऊ शकले नाहीत व त्यांचं देश सेवेचं स्वप्नं अपुर राहिला. तरी ही सामान्य रुग्ण सेवा ही तितकीच महत्त्वाची असून ती सुरू करण्याची प्रेरणा त्यांचा सेनेतील उच्च अधिकारी यांनी व्यक्त केली. त्यांनी एम.बी.बी.एस.ही पदवी कोल्हापूर येथे पूर्ण केली. त्यांनी कोल्हापूरजवळील शाहूवाडी तालुक्याततील कळे कुडित्रे या दुर्गम भागात रुग्णसेवेचे काम केले.
कळंब तालुक्यातील वडगाव ज. येथील शेतकरी व वारकरी कुटुंबात जन्मलेल्या बिभीषण भीमराव नवले व सौ कमल ताई नवले यांचे ते कनिष्ठ चिरंजीव आहेत. नवले यांनी चाळीस वर्ष सहकार शेत्रात काम केले. सुरुवातीला शेतकी अधिकारी म्हणून भोगावती, तुळजाभानी, या जिल्यातील साखर कारखाना त काम केले. तिथेच निखिल व त्यांचे मोठे भाऊ व बहीण यांचं शिक्षण साखर शाळेत सुरू झाले. आई कमल ताई यांचा मनोदयाने त्यांनी मुलांचा शिक्षणा साठी सोलापूर ला घर करायचे ठरवले. सोलापुतील प्रसिद्ध शाळेने ग्रामीण भागातून असल्यामुळे प्रवेश नाकारला. वले यांचे मित्र असलेले राजन गांधी यांचा मदतीने निखिलचा दाखला सोलापूर मध्ये करण्यात आला. तिथे त्याने पहिली पासून दहावी पर्यंत प्रथम पाच क्रमांक मध्ये राहण्याचा मान मिळाला. नंतर दयानंद महाविद्यालय सोलापूर इथे प्रवेश घेतले. आई कमल ताई नवले ह्या वडगाव जहागीरच्या विद्यमान सरपंच आहेत. त्यांचे थोरले बंधू निलेश नवले हे अमेरिकेत संगणक अभियंता म्हणून दहा वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या भगिनी स्वाती नवले ह्या महिला व बालविकास खात्यात पुणे येथे अधिकारी आहेत. त्यांच्या पत्नी डॉ.प्रियंका नवले ह्या सध्या सोलापूर येथील काम करत आहेत.