नळदुर्ग, दि. 08 : तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे गेल्या दोन वर्षापूर्वीपासून सुधाकर महाजन यांच्या घरासमोरील नालीचे काम होत नसल्याचे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे साथीचे आजार उदभवण्याची शक्यता असून तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
काटगाव येथील सुधाकर महाजन यांच्या घरातील सांडपाणी जाण्यासाठी नाली नसल्याकारणाने पाणी रस्त्यावर येत आहे. याप्रकरणी ग्रामपंचायतीस वारंवार अर्ज देवूनही काही तोडगा निघाल्याचे सांगून पाणी साचल्याने व दुर्गंधीमुळे महाजन यांच्या घरातील दोघांना यापूर्वी डेंगूची लागणी झाली होती. मात्र वारंवार तक्रार देवूनही दूर्लक्ष होत असून तातडीने नालीचे काम करावे, अशी मागणी महाजन यांनी केली आहे.