तुळजापूर : दिलासा जनविकास प्रतिष्ठान औरंगाबाद व एस बी आय फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजापूर तालुक्यातील 5 आणि लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील 5 गावात एस बी आय ग्रामसेवा माध्यमातून शिक्षण, आरोग्य, उपजीविका तसेच ग्रामविकास इ. बाबीवर गेली 3 वर्षे अविरत काम सुरू आहे, जसे की गावात अप्रगत मुलांचा शैक्षणिक दर्जा वाढवा व त्यांची शैक्षणिक गोडी वाढावी या उद्देशाने सदरील प्रकल्प अंतर्गत उपचारात्मक वर्ग सुरू करण्यात आले होते. या वर्गाच्या माध्यमातून शिक्षकांनी मुलांमध्ये शैक्षणिक दर्जा देखील वाढवला. त्यांच्या या कष्टाचे लौकिक म्हणून एस बी आय फाउंडेशन मुंबई यांनी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन आॅनलाईन गुगल मिटवर साजरा केला.
यावेळी कार्यक्रमात एस बी आय च्या मॅनेजिंग डायरेक्टर के. मंजुळा मॅडम, प्रेसिडेंट निक्सन जोसेफ सर यांनी उपचारात्मक शिक्षक व पालक यांच्याशी थेट संवाद साधला. तसेच यांच्या कामाची प्रशंसा केली. प्रकल्प व्यवस्थापक दिलासाच्या वैशाली खाडीलकर, डॉ रऊफ पठाण, विलास राठोड, रामतिर्थचे सरपंच बालाजी राठोड यांनी प्रकल्पातील अनुभव व यशोगाथा विषयी माहिती दिली. तसेच सर्व गावातील उपचारात्मक शिक्षक यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे व्यवस्थापन हे सिध्दलिंगम सर यांनी केले तर सूत्रसंचालन राजाराम सर यांनी केले. सदरील कार्यक्रमात देशातील 50 गावातील शिक्षक व पालक आपापला उत्फुर्स सहभाग नोंदवला.