हन्नूर : नागराज गाढवे 

 अक्कलकोट तालुक्यातील हन्नुर ते धोत्री या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे . हन्नुर ते धोत्री या रस्त्यावरील डांबर उडाल्याने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे.यामूळे रस्त्यांवर खड्डे की खड्यात रस्ते अशी अवस्था निर्माण झाली आहे यामूळे वाहने चालविताना अनेक अपघाताच्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. धोत्री ते हन्नूर मार्गावर प्रवास करायचे झाले तर  जीव मुठीत धरून प्रवास करावे लागत आहे. 

हन्नुर येथील आठवडी बाजारासाठी बोरेगाव पितापुर नन्हेगाव धोत्री डोंबरवळगे दर्शनाळ आदी गावांतील लोकांना याच रस्त्यावरून ये-जा करावे लागते . रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहन धारकांना वाहन चालवताना अनेक त्रास सहन करावे लागत आहे.तसेच पावसामुळे खड्यात पाणी साचल्याने वाहनाधारकाना वाहने चालविताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे . खराब रस्त्यामुळे लहान मोठे अनेक अपघात झाले आहेत.

तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा लातुर येथे जाण्यासाठी हन्नुर मार्गे जावे लागते पण रस्ता खराब झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढली आहेत त्यामुळे वाहतूकदारांना त्रास होत आहे.हन्नुर परिसरातील भाविक तुळजापूर व अक्क लकोट येथे दर्शनासाठी याच रस्त्यावरून जात असतात .पण रस्ता पुर्ण खराब झाल्यानें त्रास सहन करावे लागत आहे. हन्नूर ते धोत्री या मार्गावर गोकुळ शुगर कारखाना असल्यामुळे ऊस गाळप हंगामात सातत्याने ऊसाची जड वाहतूक  सुरू असते .त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.हन्नूर ते धोत्री रस्त्यावरील बोरेगावजवळ पूलावर मोठे भगदाड पडले आहे .वाहने चालवताना अपघात होण्याची शक्यता आहे .रस्त्याच्या मधोमध भगदाड पडल्यामुळे वाहने चालविताना त्रास होत आहे .या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत .रस्ता डांबरीकरण करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले पण अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी दखल घेतली नाही .लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळी राजकीय पुढाऱ्यांनी रस्ता डांबरीकरण करण्याची आश्वासन दिले. पण दरवेळी आश्वासनाच  विसरले जाते हन्नुर हे तालुक्यातील प्रमुख गाव असून सोलापूर व मराठवाड्यात याच रस्त्यावरून वाहनांची वर्दळ असते पण रस्ता खराब झाल्याने वाहनधारकांना त्रास होत आहे .हन्नुर ते धोत्री रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे निवडणुकीत फक्त आश्वासन दिले जाते या मार्गाने दररोज परिसरातील शेतकरी भाजीपाला फळे विकायला सोलापूर येथे जातात पण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने चप्पळगाव मार्गे सोलापूरला जावे लागत आहे .यामुळे वेळेचे व पैशांची अपव्यय होतो .तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी हन्नुर ते धोत्री रस्त्याचे डांबरीकरण करावे .अशी मागणी हन्नूर परिसरातील नागरिकांनी केली आहे .


हन्नूर लोकप्रतिनिधीचे गाव

हन्नूर ते धोत्री हा बारा किलोमीटर रस्ता असून अत्यंत दूरावस्था झाली आहे .अनेक ठिकाणी मोठ -मोठे खड्डे पडले आहेत .आणि पावसाळा असल्याने अनेक ठिकाणी खड्यात पाणी साचून रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे .वाहनधारकांना वाहने चालवताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे .यामूळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे .हन्नूर हे गाव लोकप्रतिनिधी चे गाव असल्यामुळे लोकांची वर्दळ असते .तसेच तुळजापूर आणि अक्कलकोट ला जाण्यासाठी याच मार्गावरून नागरिकांची गर्दी असते .याच रस्त्याला लागून अक्कलकोट तुळजापूर राज्य  महामार्गाची काम  चालू आहे .पण अंतर्गत रस्त्यांची अवस्था मात्र जीवघेणी झाली आहेत .हन्नूर आणि चपळगाव या गावाला शासकीय दवाखाना असल्यामुळे  वैद्यकीय उपचारांसाठी अनेक रुग्णांना याच मार्गावरून जावे लागते .पण रस्ता खराब असल्यामुळे रुग्णांना वेळेवर पोहचायला अडचण होत आहे .तरी लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

 
Top