अलीकडच्या काळात मुलांचे लग्न जमविणे ही फार मोठी समस्या मुलांच्या पालकवर्गामध्ये निर्माण होऊन बसली आहे. लग्नाच्या बाबतीमध्ये मुलींच्या पालकवर्गामधुन मुलाबद्दलच्या अपेक्षा वाढले आहे. मुलीचे अत्यल्प शिक्षण असले तरी प्रामुख्याने शासकिय नोकरी करणारच मुलगा पाहिजे, अशी अपेक्षा करणाऱ्या मुलींचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे विवाह जमविण्यास विलंब होत असुन विवाह जमण्यास विलंब झाल्यामुळे मुलांमध्ये नैराश्याची वातावरण निर्माण होऊ शकते. त्यातून मुलगा एक तर व्यसनी बनत आहे किंवा पालकांना दोष देण्याच्या प्रर्वतीकडे त्याचा कल वाढला आहे. त्याचबरोबर आजच्या काळामध्ये ३० ते ३२ वयापर्यंत तर मुलाचे स्थळ पाहण्यास जात आहे.
अलिकडच्या काळात नोकरी मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे. उच्च शिक्षण घेऊन देखिल मुलांना नोकरी मिळत नाहीत, असे चित्र दिसत आहे. तसेच शेतीचे देखिल सध्या बिकट परिस्थिती असुन सातत्याने तोट्यातील शेती करण्याची मानसिकता तरूणवर्गामध्ये राहिलेली नाही असे दिसुन येते. जगण्याचे साधन म्हणुन मग मुले अन्य अवैध धंदे करून पैसे मिळवण्याचा अन्य मार्ग शोधत असल्याचे चित्र दिसत आहेत. अशा अवैध धंद्यातील इतर सहभागी मित्राच्यांमुळे व्यसनाधिकडे ओढा वाढु लागतो व नोकरी किंवा तोट्यातील शेती करण्यापेक्षा अवैध धंदे करण्याकडे तो वळताना दिसतोय. अलिकाडच्या काळामध्ये मुलींच्या आपल्या पतीबद्दलच्या अपेक्षादेखिल वाढल्या आहेत.
अत्यल्प शिक्षण घेतलेली मुलगी देखिल आपणास मोठ्या पगाराची नोकरी करीत असलेला मुलगा पती म्हणुन मिळावा अशा अपेक्षा करू लागल्या आहेत. त्यातच मुलीच्या जन्मदर घटल्यामुळे मुलांच्या प्रमाणात मुलींची संख्या कमी झाली असल्याने मुलांच्या लग्नाची समस्या आणखीन वाढल्या आहेत. एखाद्या व्यवसायात स्थिर असलेला मुलगा चांगल्याप्रकारे पैसे मिळवत असला तरीदेखील अशा मुलाशी विवाह करण्यास मुलीची मानसिकता असल्याचे अलीकडे दिसून येत आहे. त्यामुळे अशा लग्न होत नसलेल्या मुलांच्या पालकाला काळजी वाटू लागली आहे.
पालक वर्ग मुली लग्नाच्या वयात आले की त्यांच्या लग्नासाठी पायातील वाहना झिजेपर्यंत पळताना दिसतात. मात्र असाच प्रयत्न मुलाच्या लग्नाच्या बाबतीत पाहिजे तेवढ्या प्रमाणात होताना कमी दिसतो. तसेच मुलांचे शिक्षण व नोकरी मिळेपर्यंत मुलांचे लग्नाचे वय वाढलेले असते व त्यामुळे त्यांच्या वयात अनुरूप अशा मुली मिळताना अडचणी येतात. मुलींच्या पालकांना देखील सरकारी नोकरी करणारा मुलगा मिळाला पाहिजे ही मानसिकता बाजूला ठेवून उत्तम शेती अथवा उत्तम व्यापार करणाऱ्या मुलास आपली मुलगी देणे गरजेचे आहे.
कधीकाळी आपल्याही मुलाच्या लग्नाच्या वेळी ही समस्या निर्माण होऊ शकते, याचे भान ठेवून मुलीच्या लग्नासाठी जी तत्परता दाखवली तर मुले आत्महत्या व्यसनाधिनता नैराश्य अशा घटना निश्चितपणे होणार नाहीत.