अचलेर : जय गायकवाड 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली अशोका विजयादशमी रोजी बौद्ध धम्माचा स्विकार केला आणि सोबत 5 लाख अनुयांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली. गौतम बुद्ध, राजा सम्राट अशोक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिन्हीही महापुरूषांनी बौद्ध धम्माचे चक्र गतिमान हे कालांतराने एकाच दिवशी केले आहे. म्हणून या दिवसाला खुप मोठे म्हत्त्व प्राप्त झाले आहे.  दिनाचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा आलुर शाखेच्या वतीने 64 व्या धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त सकाळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन, नुतन बुद्ध विहाराचे उदघाटन, दुपारी प्रश्न-मंजुषा, संगीत खुर्ची, रांगोळी, सायंकाळी पारितोषिक वितरण आणि व्याख्यानमाला अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.विवेकानंद वाहुळे, तालुका कार्यालयीन प्रमुख प्रा.संजय कांबळे यांनी आपले विचार मांडले. तसेच केंद्रीय शिक्षक बाळासाहेब बागडे, समता सैनिक दल जिल्हा सचिव निखिल गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा पर्यटन प्रमुख दिलीप गायकवाड, तालुका पर्यटन प्रमुख शिवानंद भंडारे, तालुका संरक्षण प्रमुख कमलाकर कांबळे, सैनिक उध्दव गायकवाड, भीमराव गायकवाड, प्रकाश गायकवाड, सुरेश गायकवाड आदींची उपस्थिती होती. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत गुरवे हे होते. सुत्रसंचालन सुनिल कांबळे यांनी केले तर सर्वांचे आभार शिवानंद भंडारे यांनी मानले.  हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पंचशील लेझिम संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.

 
Top