नळदुर्ग : एस.के. गायकवाड
येथील परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव तथा वंचित बहुजन अघाडीचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष मारुती तात्याराव बनसोडे याना समिक्षा फाउंडेशन आष्टा (कासार) ता.लोहारा च्या वतीने देण्यात येणाऱ्या "जिवन गौरव"पुस्कार-२०२० साठी निवड जाहीर करण्यात आली आहे.
मारुती बनसोडे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांनी बालपोतराज प्रथा निर्मुलन, महिला सक्षमीकरण, पंचायत राज, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण, शेती यासह सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन समिक्षा फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या जीवन गौरव पुरस्काराठी निवड झाल्याचे पत्र फाउंडेशनच्या अध्यक्षा समिक्षा गायकवाड यांनी त्यांना दिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.