उस्मानाबाद : महेश पाटील
उस्मानाबाद जिल्ह्याच्या अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना मराठवाड्यातील झालेल्या नुकसानीबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
राज्यातील काही भागात सततधार मुसळधार पाऊस होत असल्यामुळे सुगीच्या काळात शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सोयाबीन पिकाचे आतोनात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाण्यामध्येच सोयाबीन आहे. तर कांहीनी सोयाबीन ची कापनी केल्यानंतर वावरातच ठेवले असल्यामुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे.मोठ्या प्रमाणात पाणी शेतात जावून शेतीमाल, शेतातील माती वाहून गेली आहे. त्यामूळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरी अतिवृष्टी भागातील सर्व जिल्हयामध्ये झालेल्या नुकसानिचा आढावा घेऊन त्वरित आर्थिक मदत देणेबावत आदेश द्यावेत, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आ. अमर राजुरकर, आ. धिरज देशमुख, सोलापुर जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळ्ळोलगी, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, डीसी बँक संचालक सुनिल चव्हाण, उस्मानाबाद शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, लातुर जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, प्रदेश सचिव अमर खानापुरे, माजी जि.प. सदस्य दिलीप भालेराव, सभापती सचिन पाटील, सेवादल विलास शाळु, माजी सभापती रणजित पाटील, राहुल लोखंडे आदीजण उपस्थित होते.
प्रमुख मागण्या :-
1. शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रु. मदत देण्यात यावी. 2. अतिवृष्टी मृत पावलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत
करणे.
3. फळबागासाठी वेगळे पॅकेज देण्यात यावे.
4. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे.
5. अतिवृष्टिमुळे पडझड झालेल्या घरांचे पुनर्वसन करण्यात यावे.
6. पूरग्रस्त शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्यात यावे.