कळंब, दि. 21 : तालुक्यातील सौंदना गावातील कवी गणेश काटे यांची रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. ही निवड उस्मानाबाद जिल्ह्यातील युवावक्ते तसेच रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे सदस्य राम जळकोटे यांच्या माध्यमातून करण्यात आली.

या निवडीचे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अभिनेत्री अश्विनीताई महांगडे, उपाध्यक्ष निलेश जगदाळे, प्रवक्ते प्रमोद कारकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 
Top