जळकोट : मेघराज किलजे 

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन कायदे मंजूर केल्यानंतर काँग्रेसने शेतकऱ्यांना जनजागृती करून जळकोट येथे स्वाक्षरी मोहीम राबवली.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वेठीस धरणारे कायदे केले आहेत.या कायद्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळणे कठीण होणार आहे. यात खाजगी कंपन्याचा शिरकाव होऊन शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व संपुष्टात येणार असल्याने जिल्हा परिषदेचे सदस्य तथा तालुका समन्वयक प्रकाश चव्हाण, तुळजाभवानी कारखान्याचे संचालक अशोक पाटील यांनी शेतकऱ्यांना जनजागृती करून स्वाक्षरी मोहीम राबवली.

यावेळी नारायण पटणे, कृष्णात मोरे, प्रभाकर कदम, बसवराज कवठे, वजीर शेख, जितू कदम, शिवराम कदम, आनंद सावंत, राजकुमार कदम, शिवराज स्वामी, सुनील माने, प्रकाश कदम, आर.बी. टेलर, विठ्ठल कठोरे, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top