हन्नुर : नागराज गाढवे
अक्कलकोट तालुक्यातील पितापुर येथील पुरग्रस्थांना चप्पळगांव येथील श्री महालक्ष्मी प्रतिष्टान आणि दानशूर व्यक्तींनी अन्नधान्य वाटप केले.
पितापुर ता. अक्कलकोट येथील हरणा नदीला पूर आल्याने गावात प्रत्येकांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. गावातील साडेपाचशे लोकांना स्थलांतर करण्यात आले. घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्याने नागरिकांचे उपासमार होत असल्याने चप्पळगांव येथील श्री महालक्ष्मी प्रतिष्टान आणि दानशूर व्यक्ती यांनी स्थलांतरित लोकांना अन्नधान्य वाटप केले.
यासाठी बोरे गाव येथील सहकारी सोसायटी अध्यक्ष सिद्रामप्पा खेड, आडत व्यापारी निलेश धनशेटटी, ग्रामपंचायत सदस्य आशपाक हवालदार, चप्पळगांव येथील प्रकाश खैराटे, प्रदिप वाले, आप्पाराव म्हमाणे, प्रथमेश जोजन, लायक बागवान, आदींनी सहकार्य केले.
यावेळी श्री महालक्ष्मी प्रतिष्टानचे स्वप्नील बणजगोळे यांनी पितापुर आणि सांगवी येथे नदीचे पाणी गावात शिरल्यामुळे अनेक नागरीकांचे संसार उघड्यावर पडले आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची उपासमार होत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने मदत केली असल्याचे सांगितले.
श्री महालक्ष्मी प्रतिष्टान आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी सहकार्य केल्याने दिलासा मिळाला आहे, असे पितापुर आणि सांगवी येथील स्थलांतरित नागरिकांनी सांगितले. श्री महालक्ष्मी प्रतिष्टान आणि दानशूर व्यक्तींनी केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे.