उस्मानाबाद : महेश पाटील

बेंबळी (ता.जि. उस्मानाबाद) गावात पाण्याअभावी ग्रामस्थांची हेळसांड होत असल्याने युवक काँग्रेसचे तुळजापूर तालुका उपाध्यक्ष सलमान शेख व राजभाऊ यांनी उस्मानाबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची भेट घेवून बेंबळी गावातील पाणीपुरवठा त्वरित सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. 

सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या बेंबळी गावात पाणी नसल्याने गावातील हेळसांड होत आहे. रूईभर तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. मात्र गावात ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आली. ऐन दसरा, दिवाळी, ईद ए-मिलाद च्या पार्श्वभुमीवर पाण्याअभावी ग्रामस्थांचे हाल होत आहे. तसेच  बेंबळी येथील ग्रामदैवत हजरत जिंदाशाहवली हजरत लालशाहवली यांच्या ऊरसास प्रारंभ होत आहे. तरी ग्रामस्थांचे पाण्याचे हाल होत असल्याने तात्काळ पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पाण्याअभावी बेंबळी ग्रामस्थांची हेळसांड होत असून पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. पाणी विकत घेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासक यांच्याकडे सदरील विषयी मागणी करुनही दखल घेतली जात नसल्याचे तुळजापूर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सलमान शेख यांनी "तुळजापूर लाईव्ह" शी बोलताना सांगितले.

 
Top