उस्मानाबाद, दि. 17 : महेश पाटील
राज्याचे पाणीपुरवठा, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. संजय बनसोडे हे शनिवार दि. 17 रोजी उस्मानाबाद जिल्हा पाहणी दौ-यावर आले असता बेंबळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतक-यानी ना. बनसोडे यांची भेट घेवुन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसानभरपाई देण्याबाबत निवेदन दिले.
उस्मानाबाद जिल्हातील सर्व तालुक्यात पावसाने शेतकरी बांधवांचे खूप मोठे नुकसान झाले. परतीच्या पावसाने सोयाबिन पिकांचे अतोनात नुकसान झाले. बहुतांश जणाचे सोयाबीनचे ढिगारे वाहून गेले. तर ढिगा-या खाली पाणी गेले. गळित हंगामासाठी जाणारा ऊसाचे फड ही भूईसपाट झाले. फळबागाचे खूप नुकसान झाले. शेतशिवारातील बांधबंधिस्त केलेले तर शेतातील माती वाहून गेल्याने शेतकरी बांधवांवर खूप मोठे संकट आले आहे. तसेच 10 दिवसावर रब्बी पिकाची पेरणी व काढणी मोडणी च्या तयारीत असलेला शेतकरी बांधव हतबल झाल्याचे वास्तवदर्शी चिञ उभे झाले आहे. जिल्हायातील शेतकरी बांधवांना पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी याबाबतचे निवेदन बेंबळीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जीवनराव बरडे, युसूफ शेख, बाळासाहेब कणसे, श्रीमंत पवार, इम्रान पठाण, गौतम क्षिरसागर यांनी ना. संजय बनसोडे यांना दिले.