किलज, दि. 19 :  अतिवृष्टीमुळे किलज ता. तुळजापुर येथील अनेकांच्या घरांत पावसाचे पाणी शिरुन घराची पडझड झाली. त्यामुळे त्यांचे संसार उघडयावर आला आहे. या पार्श्वभुमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून किलज येथील १३ कुटुंबांना प्रत्येकी १०,००० रुपयांची मदत करण्यात आली.

गेल्या आठवडयात तुळजापुर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे किलज ता. तुळजापूर येथील अनेक घरांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. यात नदीलगतच्या कुटुंबाला मोठा फटका बसला आहे. त्यांची घरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. याची काळजी घेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आर्थिक मदत केली आहे. यामध्ये आपत्तीग्रस्त १३ कुटुंबाना दि.१८ ऑक्टोबर रोजी प्रत्येकी १०,००० रु मदत करण्यात आली. आपण खचून जाऊ नका तर आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगण्यात आले. 

यावेळी माजी सभापती जिल्हा उपाध्यक्ष दिपक आलुरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, तालुकाध्यक्ष संतोष  बोबडे, नारायण  नन्नवरे, माजी जिप सदस्य वसंतराव  वडगावे, उपसभापती शिवाजी गोरे, प.सं. सदस्य सिध्देश्वर  कोरे, भिवाजी इंगोलें, दयानंद मुडके यांच्यासह गावातील वैजिनाथ कोनाळे, दिनकर पाटील, बालाजी शिंदे, प्रल्हाद सगर, दगडू शिंदे,विठल मरडे,महादेव पाटील,नामदेव शिंदे आदीजण उपस्थित  होते.

 
Top