तुळजापुर : कुमार नाईकवाडी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह इतर मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात विचार करण्यात यावा, अशा आशयाचे एक लेखी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुळजापुर तालुक्यात दौऱ्यावर आले असता मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मराठा समाज बांधव गेल्या अनेक वर्षापासून विविध आंदोलनाच्या माध्यमातून लढा देत आहे. पण या मागण्याकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष होत आहे. तरी मराठा आरक्षणा संदर्भात सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण स्थगिती तात्काळ उठवावी, तुळजापुर शहरातील छञपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे काम लवकर करावे, अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतातील पिकाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी, मराठा आरक्षण मिळेपर्यत महाराष्ट्रात कोणतीही नौकर भरती करु नये, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी नराधमाना तात्काळ फाशी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक महेश गवळी, प्रतिक रोचकरी, सुनील नागणे, जिवन इंगळे, कुमार टोले, विजय माने, अर्जुन सांळुके, आण्णासाहेब क्षिरसागर, अलोक शिंदे, चैतन्य शिंदे, धैर्यशील कापसे, महेश डोगंरे, नितीन रोचकरी, महेश चोपदार, दत्ता मोरे आदीसह मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या समन्वयकाच्या स्वाक्षरी आहेत.