तुळजापुर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यांना तात्काळ मदत होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्याला कर्ज काढण्यासाठी गरज आहे. याबाबतीत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटून कर्ज काढण्यासाठी विनंती करणार आहे. पिक विम्याच्या निकषातील अडचणी पाहता त्यास शिथिलता देण्यासाठी मागणी करण्यासाठी प्रयत्न करणार असून या आर्थिक संकटातुन  शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार कडुन प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी तुळजापुर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी दोन दिवस दौऱ्यावर आले होते. सोमवार दि. १९ रोजी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री  मधुकरराव चव्हाण, आमदार सतिश चव्हाण, विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे, जिवनराव गोरे, संजय निंबाळकर, रा.काँ. युवती प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर, रा.काँ. जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जि.प. सदस्य महेंद्र धुरगुडे, संजय दुधगावकर, गोकुळ शिंदे, रा.काँ. तालुका अध्यक्ष,  धैर्यशील पाटील, रा.काँ.युवक चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, शहरअध्यक्ष अमर चोपदार, युवक शहर अध्यक्ष शरद जगदाळे, संदीप गंगणे, गणेश नन्नवरे, आप्पा पवार, तौफीक शेख, मकसुद शेख आदीसह रा.काँ.कार्यकर्ते उपस्थित होते. 

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, विधानसभेत ५३ वर्षे झाली मी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. माझ्या बळीराजा शेतकऱ्यांवर मोठे संकट आल्यावर मी स्वस्थ बसु शकत नाही. माझ्या हातात प्रशासनाची जवाबदारी नाही. परंतु शेतकऱ्यांना संकटातुन बाहेर काढण्यासाठी नियम बदलणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांकडे चांगल्या दृष्टीने पाहिले पाहिजे. शेतकऱ्यांच्या पाठी मागे खंबीर पणे उभे राहून राज्य सरकार ने कर्ज काढुन तात्काळ मदत दिली पाहिजे. शेतीच्या नुकसानीची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागत आहे, याची खंत वाटते. केंद्र सरकारने राज्य सरकारला मदत केली पाहिजे. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्याना मदत कोणत्या प्रकारे कशी मदत मिळते यासाठी आपण प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांनी आजपर्यंत माझ्यासाठी भरपूर केले आहे. त्यांच्यामुळे मी आज इथपर्यत पोहंचले आहे. त्यामुळे त्याना वा-यावर सोडणार नसल्याचे सांगितले.  

यावेळी पवार यांना भाजपामध्ये गेलेल्यांची घरवापशी होणार का? अशी विचारणा केली असता पवार म्हणाले क,  भाजपामध्ये गेलेल्या काहीन राष्ट्रवादीमध्ये यायच आहे माञ त्यांच्यासाठी नियम लावले आहेत. आपण जेथे आहात त्या ठिकाणी सुखात राहा? असा टोला लगावला. 

भाजपाचे जेष्ट नेते एकनाथ खडसे सध्या भाजपाला सोडचिट्टी देवून पक्षातंर करणार याची चर्चा सुरु आहे ? राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का? अशी विचारणा केल्यावर पवार म्हणाले की, एकनाथ खडसे यांचे भाजपासाठी मोठे योगदान होते. ते एकेकाळी विरोधी पक्ष नेते, अर्थमंञी होते. पक्ष उभा करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. मात्र भाजपाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या त्यागाची सध्या नोंद घेतली गेली जात नाही. त्यामुळे सध्या पक्षातंराच्या विचारात असतील असे मत खडसेच्या प्रवेशा बाबत पवारानी केले.

"राज्यातील अनेक शेतकऱ्यांना कमी पाण्यात ऊस कसा लावता येईल, तशा पद्धतीने ऊसाचे बेने परदेशातुन महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करणार" याविषयी बोलताना पवार म्हणाले की,  पुर्वीच्या काळात गहु, तांदुळ खरेदीसाठी किमान किंमत ठरवायचा अधिकार मंञी मंडळाना असायचा. मात्र आता नाही. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सरकार जिवाभावाने काम करीत आहे. राज्यातील सहकारी कारखाना नवसंजवनी देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारखाना चालु झाला तर शेतकऱ्यांना नक्की फायदा होणार. त्यासाठी जशे डॉ. आंबेडकर कारखानाच्याचे अरविंद गोरे यांनी अत्याधुनिक ऊसाचे यंञ परदेशातुन आणले. त्या पध्दतीने राज्यातील कारखान्यातील कारखानदार यांनी आणुन अत्याधुनिक यंञसामुर्गीचा वापर करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 
Top