उस्मानाबाद, दि. 04 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 02 नोव्हेंबर 2020 रोजी 05 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 चा कार्यक्रम घोषित केला असून, कार्यक्रम घोषित केल्‍याच्‍या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आली आहे भारत निवडणूक आयोगाने त्‍यांच्‍या निर्देशानुसार कोणत्‍याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्‍या मोटारगाडया/वाहने यांच्‍या ताफ्यात पाच पेक्षा अधिक वाहने नसावीत असे निर्देश दिलेले आहेत.      

उस्‍मानाबाद जिल्‍हयातील निवडणूकीची  संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातून पाच पेक्षा अधिक मोटार गाडया/वाहनाच्‍या ताफ्याचा वापर करण्‍यांस प्रतिबंध घालणे आवश्‍यक असल्‍याने, जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी, कौस्तुभ दिवेगावकर यांनी फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 अन्‍वये मला प्रदान करण्‍यांत आलेल्‍या शक्‍तीचा वापर करुन असे आदेश देत आहे कीं, कोणत्‍याही वाहनाच्‍या ताफ्यामध्‍ये पाच पेक्षा जास्‍त मोटार गाडया अथवा वाहने 

 (Cars/Vechicles) वापरण्‍यास या आदेशाव्दारे निर्बंध घालण्‍यांत येत असल्याचे आदेश जारी केले आहेत. सदरील आदेश दि. 07 डिसेंबर 2020 पर्यंत अंमलात राहतील. 

 
Top