तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
सन २०१४/२०१८/२०१९-२० मध्ये एस ई बी सी प्रवर्गा अंतर्गत नोकर भरतीमध्ये निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना सर्व समावेशक, सर्वासोबतच तात्काळ नियुक्त्या मिळाव्यात यासाठी तहसीलदार तुळजापूर व जिल्हाधिकारी यांना शिवसेवक समिती उस्मानाबाद यांच्या वतीने दि.3 रोजी निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, राज्य शासनाने सन २०१४ च्या एसईबीसी प्रवर्गातील ,सन 2२०१८/१९/२० मधील जाहिराती नुसार शासकीय नोकर भरती प्रक्रिया पूर्ण घेतली असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अद्याप पर्यंत नियुक्त्या दिल्या गेल्या नाहीत .प्रशासनाच्या विविध जाहिराती मधील उमेदवार हे निवड झालेलं असून नियुक्तीचे मागील ८ ते ९ महिन्यांपासून प्रतीक्षा करत आहेत परंतु ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली गेल्याचे कारण सांगत या उमेदवारांच्या नियुक्त्या अडवून ठेवल्या आहेत.
न्यायालय सुप्रीम कोर्टाने ९ सप्टेंबर पूर्वी झालेल्या नियुक्त्या कायम करण्याचे आदेश दिले असताना एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना नियुक्त्या न देता ते अडवण्याचा काही अधिकाऱ्यांचा डाव असून यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. राज्य सरकारने यावर तात्काळ निर्णय घेने आवश्यक आह. मराठा आरक्षण स्थगिती निर्णयामध्ये दिले आहे की एसईबीसी साठी ९ सप्टेंबर २०२० च्या पूर्वीचा लाभ अबाधित राहील व पूर्वलक्षी प्रक्रिया असताना देखील पात्र उमेदवारांना शासकीय अधिकारी या विद्यार्थ्यांना रुजू करून घेत नसल्याने याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ,उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या १० अक्टोबर रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये या विषयावर सखोल चर्चा झाली होती.तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून गेल्या वर्षभरात अधिकारी आणी मंत्र्याच्या जवळपास चार वेळा बैठका होऊन निवेदनाद्वारे सूचित करत सरकारची व शासनाचीही चर्चा झाली असून त्यानुसार या सर्व विभागातील उमेदवाराना तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात असेही नमूद करण्यात आले आहे.
सत्ताधारी पक्षातील काही ओबीसी नेते मराठा विद्यार्थ्यांना वगळून किंवा एसईबीसीच्या जागा रिक्त ठेवून निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचा घाट घालत असून ,यामुळे शासकीय सेवेत निवड झालेल्या मराठा विद्यार्थ्यांचे फार मोठया प्रमाणात नुकसान होणार आहे. मराठा विद्यार्थ्यांना डावलून निवड प्रक्रिया पूर्ण करू नये याची नोंद सरकारने घ्यावी अन्यथा पुन्हा एकदा ठोक मोर्चाच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांच्या न्यायहक्कांसाठी राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल यातून कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी शिवसेवक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सर्जेराव गायकवाड, निरंजन करंडे,छत्रपती मराठा सेनेचे सचिन शिंदे, दत्तात्रय गवळी, महेश गायकवाड, प्रशांत गायकवाड, धनाजी नेटके,निलेश चिवरे, समाधान गायकवाड आदी उपस्थित होते.