तुळजापूर : कुमार नाईकवाडी
आखिल भारतीय विद्यार्थी परिषद तुळजापुर शाखेच्यावतीने वतीने शुक्रवार दि. ६ शुक्रवार रोजी येथील आर्य चौक येथे अर्णब गोस्वामी केलेल्या अटकेचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच यावेळी तोंडावर काळी पट्टी बांधून तहसिलदारांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
अर्णव गोस्वामी एफआयआर दाखल न करता बिनबुडाच्या आरोपाखाली अटक केल्याचा निषेध व्यक्त करुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडुन तोडांवर काळी पट्टी बाधूंन व तुळजापूर शहरातून निषेधाच्या पाट्या दाखवत राज्य सरकारचा निषेध करीत येथील तहसीलदार यांना मागण्याचे निवेदन देण्यातआले.
यावेळी अभाविपचे पृथ्वीराज महामुनी, दयानंद शिंदे, लक्ष्मी चांदीरण, अथर्व पाटील, करण देशमुख, योगीराज जाधव, पूजा कुंभार आदींची उपस्थिती होती.