तुळजापुर : कुमार नाईकवाडी
राज्य सरकारने साधु संतावर पोलीसा मार्फत दबाब आणण्याचा प्रयत्न केला असून राज्यातील ठाकरे सरकार हे मोगलाई पेक्षा वाईट आणि ब्रिटीशापेक्षा काळं सरकार असल्याची टीका भाजपा अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी तुळजापूर येथे शुक्रवार दि. 6 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत केली.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात दि. ५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील मंदीरे उघडण्यासाठी भाजपा अध्यात्मिक आघाडीचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु झाले होते. मात्र या बेमुदत धरणे आंदोलनाच्या स्थळावरील तंबु रातोरात उखडून टाकला. तसेच श्री तुळजा भवानी मंदीर परिसरात ३०० मिटर अंतरावर कलम १४४ लागू करुन जमाबंदी आदेश काढण्यात आला. त्याचबरोबर साधु संताना पोलीसांनी नोटीसा देवून आपल्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील जर आंदोलन सुरु ठेवले तर आपल्याला अटक करावी लागेल, अशी तंबी देण्यात आली होती.
त्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील पुजारी मंगल कार्यालयात दि. ६ नोव्हेंबर रोजी रोजी भाजपा अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी पञकार परिषद आयोजित करुन सदरील धरणे आंदोलन स्थगित करीत असल्याचे बोलताना सांगितले.
पुढे बोलताना तुषार भोसले म्हणाले की, गेल्या ८ माहिन्यापासुन महाराष्ट्रातील मंदीरे बंद आहेत. हे सरकार साधु संताशी जाणीव पुर्वक मंदीरे उघडण्यासाठी टाळा टाळ करीत आहे. मंदीरे उघडण्या बाबतीत कोणताही प्रतिसाद देत नाही. लोकशाही मार्गाने मंदीर उडण्याबाबत आंदोलन केले तर जनतेचा लोकशाही मार्गाचा अधिकार या सरकारन हिसकावून घेतला. आता महाराष्ट्रात आणीबाणी सुरु झाल्याचा आरोप करुन पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात पञकारावर खोटे गुन्हे नोंदवून पञकारांना अटक होत आहे. पञकारावर दबाब तंञाचा वापर केला जात आहे. लोकशाही पद्धतीने साधु संतासह पञकारावर दबाब आणत आहेत. लवकरच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, यासाठी आपण राष्ट्रपती यांना पञ लिहणार असल्याचे सांगून हिम्मत असेल तर निवडणूक लावुन दाखवा, तुमचं सरकार पाडू असे थेट आवाहन भोसले यांनी ठाकरे सरकारला दिले.
तसेच साधु संत कोणालाही घाबरत नाहीत. आमच्या मुळे श्री देवीचे दर्शन बाहेरून घेणाऱ्या भाविकांना अडथळा येवु नये म्हणून आम्ही हे धरणे आंदोलन स्थगित करीत आहोत. गेल्या ८ माहिन्यापासुन व्यापारी वर्गासह पुजारी वर्गाची उपासमार होत आहे. त्यामुळे आमच्या अतंकरणाला योग्य वाटत नाही. या काळ्या सरकारचा काळ्या फिथी लावून आम्ही साधु संत निषेध करीत आहोत. या राज्य सरकारने महाराष्ट्रातील तमाम देवी भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. महाराष्ट्रात सर्व सुरु झाले माञ मंदीरे सुरु होत नाही. मग राज्य सरकार मंदीरे का खुले करीत नाही? साधु संताच्या धरणे आंदोलना बाबतीत हे आंदोलन धुडकावून टाकल्याने महाराष्ट्रातील तमाम साधु संताच्या भावना दुखावल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यभरातील साधु संत तसेच तुळजापुर तालुक्याचे भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नारायण नन्नवरे, विनोद गंगणे, नगरसेवक बापु कणे, विक्रम देशमुख, विशाल रोचकरी, आनंद कदंले, गुलचंद व्यवहारे, सुहास सांळुके, शिवाजी बोधले, इंद्रजीत सांळुके, रविकांत भोसले, प्रसाद पानपुडे, बाळासाहेब श्यामराज आदीसह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.