उस्मानाबाद, दि. 5 : जिल्ह्यात कोरोना (कोविड-19) चा संसर्ग सुरू आहे. कोरोना रूग्ण संसर्गाची संख्या कमी होत आहे. ही बाब समाधानाची असली तरी आरोग्य विभागातील अधिकारी/कर्मचारी यांनी समन्वय ठेवून कोरोना रूग्णांना आरोग्य सेवा पूर्वरत सूरू ठेवावी.असे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित राष्ट्रीय आरोग्य अभियानअतंर्गत विविध विषायाचा आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए.जी.नवाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.ए.व्ही.वडगावे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले की,जिल्ह्यात कोरोना रूग्णाचा संसर्ग कमी होत चालला तरी आरोग्य विभागाच्या अधिकारी/कर्मचारी यांनी समन्वय ठेवून कोरोना रूग्णांना आरोग्य सेवा सुरूच ठेवावी असे,सूचित करून राष्ट्रीय अभियानामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विषयाचा आढावा घेवून संबंधिताना योग्य त्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या आढावा बैठकीमध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री सुरक्षीत मातृत्व अभियान,राष्ट्रीय किशोरी स्वास्थ कार्यक्रम, कुष्ठरोग शोध व सनियंत्रण कार्यक्रम,आपत्कालीन सेवा (ईएमएस-108), प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, रुग्ण कल्याण समिती,अनाधिकृत वैद्यकीय व्यवसाई सर्व विषयांचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले.
या बैठकीस डॉ. के.के. मिटकरी, प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी,श्रीमती शेख,उप-पोलीस अधिक्षक, मुख्यालय (प्रतिनिधी), डॉ.एम.आर. पांचाळ, जिल्हा हिवताप अधिकारी, डॉ.होळे, वैद्यकीय अधिकारी, डॉ.खडके (प्रतिनिधी ),सहायक संचालक कुष्ठरोग, डॉ.राजेश कुकडे, डॉ.किरण गरड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय/उपजिल्हा रुग्णालय सर्व,तालुका आरोग्य अधिकारी सर्व जिल्हा स्तरीय समन्वयक उपस्थित होते.