उस्मानाबाद, दि. 09 : सन २०२०-२१ या वर्षाकरिता राज्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी मंडळाने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे मंडळातर्फे आवाहन करण्यात येत आहे.
राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी मुख्याध्यापक/प्राचार्यामार्फत आपले निबंध सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, भांबुर्डा,बालचित्रवाणी शेजारी, शिवाजीनगर,पुणे-४११००४' किंवा 'विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती,नाशिक, लातूर, कोकण विभागीय मंडळ' या पत्त्यावर १५ जानेवारी,२०२१ अखेर पोहोचतील.
अशा रितीने समक्ष सादर करावेत किंवा पोस्टाने पाठवावेत. पाकिटावर “माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा सन २०२०-२१"असा ठळक उल्लेख करावा.मंडळाकडे निबंध सादर करण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी, २०२१ अशी आहे. यानंतर प्राप्त झालेले निबंध विचारात घेतले जाणार नाहीत. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसंबंधीचे हे निवेदन राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणून दयावे, तसेच त्यांना स्पर्धेत सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करावे.निबंधाचे विषय:-१.तंत्रस्नेही शिक्षक- काळाची गरज.२.वाचनसमृध्दी- शिक्षकांसाठी अपरिहार्य.३. उपक्रमशीलता आणि शिक्षक४. विद्यार्थी व शिक्षक- शरीर / मनःस्वास्थ्य नवीन शैक्षणिक धोरण आणि माझी भूमिका.असे आवाहन सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे यांनी केले आहे.