तुळजापूर, दि. 06 : महाराष्ट्रातील जनतेने भाजपा व फडणवीसांना  शंभर टक्के धुडकावुन  त्यांना विरोधी पक्षाचे काम करण्याचा संदेश दिल्याने त्यांनी आपली बडबड बंद करुन विरोधी पक्षाची भुमिका बजावावी, असे प्रतिपादन शिवसेनेचे सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी केले.

श्री मुदगुलेश्वर  या  ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ करण्यात आलेल्या विविध  विकास कामांचा   उद्घाटन  सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी महंत तुकोजीबुवा,  बाबा गुरु, बजाजी बुवा, महंत मावजीनाथ बुवा, गुरू तुकनाथ बुवा व सतगुरू सदानंदजी महाराज,  महंत चिलेजी बाबा, गुरूहमरोजी बाबा याच्यासह महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाची अध्यक्षा सौ ज्योतीताई ठाकरे , आमदार ज्ञानराज चौगुले, अनिल खोचरे, दत्ता अण्णा साळुंके, गौतम लटक, लक्ष्मणजी वडतीले, शामल पवार , डॉक्टर  शोभाताई बेदरगे,   सविताताई किवंडे , सखुताई लटपटे परभणी , अॅड.उज्वलाताई भोपळे  यांच्या प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना राऊत पुढे म्हणाले कि नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत विरोधी पक्षनेते देंवेद्रफडणवीस यांना स्वताच्या  घरातील उमेदवार विजय  करता आला नाही, त्यामुळे  मतदारांनी महाविकास आघाडी सरकारवर विश्वास दाखवला आहे .अमरावती येथे भाजपाचा नाहीतर धनशक्ती विजय झाला आहे.त्यामुळे भाजपा ने आता विरोधी पक्षाची भुमिका बजावत राहावे, असे यावेळी स्पष्ट केले .

या  कार्यक्रमाचे प्रास्ताविक शामल ताई पवार (वडणे) यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवसेना शहर प्रमुख सुधीर कदम यांनी मानले. यावेळी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व भक्त मोठ्या संखेने उपस्थितीत होते.

 
Top