कळंब, दि. 14 : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषी विधेयक शेतकरी हिताचे असल्याबाबत केलेले विधान हे दिशाभूल करणारं असुन राजकीय अभिनिवेशातुन आहे. आ. राणा पाटील यांनी खुली चर्चा करण्या साठी तयार रहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे माजी युवक अध्यक्ष ॲड. प्रवीण यादव यांनी केले आहे.
आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी शेतकरी आंदोलनावर टीका करत शेतकऱ्यांना त्यांच्या हितासाठी तिन्ही कायदे फायदेशीर असल्याचे वक्तव्य करून शेतकऱ्यांना कृषी विधेयक संबधी माहिती व अभ्यास नाही, अशा स्वरुपाचे केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. महत्त्वाचं म्हणजे तीनही कायद्यातील तरतुदी या एकमेकांना पूरक व निगडित आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमाल खरेदीसाठी कोणत्याही कंपनीच्या किंवा खरेदीदारा सोबत करार करताना त्यामध्ये ठरवला जानारा शेतमालाचा दर हा हमी भावापेक्षा कमी दराचा असेल तर करार करता येणार नाही, किंवा केला तर तो बेकायदेशीर असेलअशी तरतूद करणे अपेक्षित होते परंतु तशी तरतूद करण्यात आली नाही हाच खरा कळीचा मुद्दा असल्याचे ॲड. यादव यांनी सांगितले.
केंद्र सरकारने हे विधेयक मंजूर करताना भांडवलशाही व्यवस्था पुरक आणि शेतकऱ्यांना ठराविक कालावधीनंतर धोकादायक असे कायदे आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस खुल्या चर्चेसाठी तयार आहे. भाजपाने शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यापेक्षा अन्नदाता शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका करण्यापेक्षा तकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या सुचनेनुसार केंद्र सरकारने कायद्यात सुधारणा करावी यासाठी खुल्या चर्चेसाठी आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक जिल्हाध्यक्ष अॅड प्रविण यादव यांनी केले. ठिकाण वेळ कोणतीही चालेल असेही त्यांनी स्पष्ट केले.