चिवरी,दि.९ : तुळजापूर तालुक्यातील उमरगा (चि) येथे माझा गाव सुंदर गाव अभियानाला ग्रामस्थांनी ग्रामस्वच्छता करून उत्साहात सुरुवात केली आहे.
गावात स्वच्छता राखणे आणि गावांमध्ये एकीची भावना निर्माण करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे, या अभियानांतर्गत ग्रामपंचायत कार्यालय सुंदर बनवणे, आरोग्य विषयी सुधारणा करणे, पर्यावरण व वृक्षसंवर्धन करणे आदी बाबींचा समावेश आहे. यासाठी ग्रामस्थांनी स्वच्छतेची शपथ घेत अभियानाला सुरुवात केली व तसेच गाव परिसर स्वच्छ करण्यात आला,
यावेळी ग्रामसेवक गोरोबा गायकवाड, उपसरपंच अण्णाराव कदम, पोलीस पाटील महेश पाटील, पोस्टमन विद्याधर शिरगिरे, ग्रामपंचायत कर्मचारी आदीसह ग्रामस्थ उपस्थित होत.